Panchayat Season 4 रिलीज डेट |अभिषेक, मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यातील राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार!

Panchayat Season 4: गावगुंडांचं राजकारण आणि अभिषेकचं नवं संकट!

    • अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी वेब सिरीज ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘Panchayat Season 4’ हा नवीन भाग २४ जून २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रदर्शित होणार आहे. मागील सीझनमध्ये घडलेल्या रोमांचक घटनांनंतर, यावेळी आपल्याला फुलेरा गावातील पंचायत निवडणुकीतील गरमागरम राजकारण, अभिषेकचे नवे संकट आणि स्थानिक नेत्यांमधील स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Panchayat Season 4

काय असेल कथानक?.

    • Panchayat Season 3 मध्ये कथा जिथे संपली तिथेच Panchayat Season 4 सुरू होतो. सचिवजी म्हणजेच अभिषेक त्रिपाठी यांना तुरुंगात टाकले जाते आणि मंजू देवींना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर आमदारांच्या माणसांनी हल्ला केला. यामुळे गावात गोंधळ निर्माण होतो आणि सर्वांचे लक्ष पंचायत निवडणुकीवर असते.
    • या निवडणुकांमध्ये एकीकडे आहे मंजू देवी आणि तिचं टीम – जिथं आहे वाईट अनुभवातून शिकलेला, सरळमार्गी आणि कर्तव्यदक्ष सचिवजी; तर दुसरीकडे आहे भूषण आणि क्रांती देवी – जे सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. या सिझनमध्ये राजकीय डावपेच, वैयक्तिक संघर्ष आणि गावकऱ्यांच्या जीवनातील बदल पाहायला मिळणार आहेत.

कलाकारांची फौज

  • या Panchayat Season 4 मध्ये प्रेक्षकांचे लाडके अभिनेते पुन्हा आपल्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत:
    • जितेंद्र कुमार – अभिषेक त्रिपाठी (सचिवजी)
    • नीना गुप्ता – मंजू देवी रघुबीर यादव – ब्रिजभूषण दुबे (प्रधानी)
    • चंदन रॉय – विकास
    • सान्विका – रिंकी
    • फैसल मलिक – प्रल्हाद
    • दुर्गेश कुमार – भूषण
    • सुनीता राजवार – क्रांती देवी
    • पंकज झा – आमदार चंद्रकिशोर सिंग

सिझन 4 चे वैशिष्ट्य

    • Panchayat Season 4 मध्ये एकूण 8 भाग असतील आणि प्रत्येक भाग 25 ते 50 मिनिटांचा असेल. या सिझनचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं असून लेखन चंदन कुमार यांचं आहे. ‘The Viral Fever (TVF)’ च्या बॅनरखाली तयार झालेली ही सिरीज हसवते, विचार करायला लावते आणि ग्रामीण भारतातील राजकारण आणि प्रशासन यांचं वास्तव दाखवते.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

    • ‘पंचायत’ ही सिरीज ज्या पद्धतीने ग्रामीण जीवन, साध्या लोकांचे विचार, आणि गावगुंडांपासून सचिवजींचा संघर्ष दाखवते, त्यामुळं ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे. प्रत्येक सिझनप्रमाणे, या सिझनमध्येही विनोद, भावना, आणि तीव्र राजकीय रंग भरलेला आहे.

हे पण वाचा :- RBI चा रेपो दर कपात निर्णय – EMI होणार अजून कमी? / RBI Repo Rate June 2025Tatkal Tickets चे नवीन नियम 2025, इंग्लंडमध्ये इतिहास घडला – ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अभूतपूर्व विक्रम

Leave a Comment